पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मृत्यू वाढले

यावर्षी 9 महिन्यात 65 मृत्यू
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच राज्यभरातील वाहतूक पूर्वपदावर आली त्यामुळेच अपघातांची संख्या सुद्धा वाढू लागली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गेल्यावर्षीच्या नऊ महिन्याच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर यादरम्यान गंभीर, किरकोळ अशा एकूण 147 अपघातांमध्ये 65 मृत्यू झाले आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात बोरघाटातील उतरत्या वळणदार रस्त्यांवर झाले असून, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्यानेही अपघातांमध्ये मृत्यूची आकडेवारी वाढली आहे.

द्रुतगती महामार्गावरील अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि एनजीओ च्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, वाहन चालकांच्या बेजबाबदरीपणा आणि मुळे लेन कटिंग, ओव्हर स्पीड, ओव्हर टेक, सीट बेल्टचा वापर टाळणे, वाहन चालवतांना फोनचा वापर करत असल्याने अपघातांचे कारण आढळून येत आहे. त्याशिवाय महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनही वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, यामध्ये अपयशच पदरी पडत आहे.

Mumbai
थकीत ऊस बिलासाठी वारंवार चकरा, शेतकऱ्याच्या पदरी निराशा

गेल्यावर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर बंदी असतानाही 9 महिन्यात 104 अपघातांमध्ये 46 मृत्यू झाले आहे. तर वर्षभरात 160 एकूण अपघात होऊन 66 मृत्यू झाले आहे. यातुलनेत कोरोनाच्या पूर्वी 2019 मध्ये वर्षभरात 306 अपघातांमध्ये 92 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा अपघातांची आकडेवारी जास्त आढळून येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहनधारकांना दंड करूनही वाहतूक नियमांचा वापर केला जात नसल्यानेच अपघात होत असल्याची खंत महामार्ग पोलीस विभागाकडून व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com