निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

मुंबई - कोरोनामुळे मुंबईकरांच्या चिंतेत दिवसागणिक वाढ होताना पाहायला मिळतेय. केवळ दोन दिवस कमी झालेले कोरोना रुग्णांचे आकडे आणि त्या नंतर पहिले पाढे पंचावन्न. याला स्वतः मुंबईकरच जबाबदार आहेत. कारण सरकार आणि सर्व माध्यमांकडून, डॉक्टरांकडून वारंवार सांगूनही मुंबईकर घराबाहेर जाताना पाहायला मिळतात. मग कधी त्याला कारण असतं भाजीचं कधी मेडिकलचं. कधीही न थांबणाऱ्या मुंबईला घरात राहण्याची सवय नाहीये आणि त्यामुळे मुंबईकर काहीनाकाही कारण काढून घराबाहेर पडतोय.

अशात केंद्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारा अहवाल समोर आला. यामध्ये १५ मे पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाख इथवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कंटेनमेंट झोनमधील वर्सोवा कोळीवाड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा कोळीवाड्यात 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. वेसावे कोळी जमात संघटनेची आज एक बैठक पार. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकमताने या सर्वांनी हा महत्त्वाचा घेतला आहे. वर्सोवा कोळीवाड्यात आतापर्यंत आढळले कोरोना पॉझिटिव्ह 17 रुग्ण आढळले आहेत. यापैकी पाच रुग्ण आता 5 रुग्ण आता उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन स्वतःच्या घरी परतण्याचा स्थितीत आहेत. 

decision is taken people to observe strict janata curfew from 24th to 26th april

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com