11 वर्षांनंतर विमान प्रवाशांमध्ये झाली एवढी घट...

File Photo
File Photo

मुंबई : मुंबई व नवी दिल्ली येथील विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत 2008 नंतर या वर्षी प्रथमच घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा देशातील या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासी कमी झाले आहेत. देशातील आर्थिक मंदी हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये जेट एअरवेज बंद झाल्यामुळे या दोन विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत घट झाली; मात्र परदेशांत जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारशी घट झाली नाही. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र या दोन्ही प्रकारचे प्रवासी घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. या दोन विमानतळांवरील प्रवाशांची संख्या 2018 मध्ये 1.4 कोटी होती, तर 2019 मध्ये ही संख्या 1.3 कोटींवर आली. तब्बल 11 वर्षांनंतर हवाई प्रवाशांच्या संख्येत सात टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाच्या (आयटा) अहवालानुसार, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुंबईतील हवाई प्रवाशांच्या संख्येत सात टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेजची अखेर, धावपट्टीची दुरुस्ती, अतिवृष्टी या कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे या दोन देशांतील हवाई वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागली. 

प्रवाशांची संख्या 
मुंबई विमानतळ 2018 2019 घट 
देशांतर्गत 4.98 कोटी 4.7 कोटी 5.6 टक्के 
आंतरराष्ट्रीय 1.4 कोटी 1.3 कोटी 7 टक्के 

Decrease the number of air passengers after 11 years

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com