
Dahisar Toll Naka
ESakal
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वारावर असलेला दहिसर चेकनाका कोंडीच्या कारणावरून स्थलांतर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले असून, दिवाळीच्या आधी तो स्थलांतर होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच केली आहे, मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केला आहे. या स्थलांतराने कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.