Road Potholes
ESakal
मुंबई
Navi Mumbai: गणरायांना खड्ड्यांतूनच निरोप! रस्त्यांची दयनीय अवस्था; कोट्यवधी खर्चूनही काम निकृष्ट
Road Potholes: रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झाले असले तरी खारघरमधील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे खड्ड्यांतून गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
खारघर : लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी खारघरमधील खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झाले असले, तरी पावसाळ्याच्या पहिल्याच सरींनंतर डांबर वाहून गेल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

