काही काळ अज्ञातवासात असलेला तो परत येतोय स्वागताची कार्यकर्त्याकडून जय्यत तयारी

असा प्रश्न मात्र राजकीय निरीक्षक विचारत आहेत.
Mumbai
MumbaiSakal

मीरा भाईंदर : भाजपचा (BJP) चेहरा माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehata) यांचे तब्बल दोन वर्षाच्या अज्ञातवासानंतर भाजपात(BJP) येत आहेत. त्यांच्या स्वागताचा इव्हेन्ट जोरात करण्याचे काम आता पासूनच त्यांच्या समर्थकांनी सुरु केला असून. नाक्या नाक्यावर त्यासाठी मोठं मोठी होल्डिंग (Holding) हि लागली गेली आहेत. परंतु अज्ञातवासात गेलेला हा नेता खरोखरच पक्षापासून लांब गेला होता का?: असा प्रश्न मात्र राजकीय निरीक्षक विचारत आहेत.

अपक्ष नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत दाखल झालेल्या मेहता यांचे नशिबच फळफळले आणि त्यांच्या मस्तकी महापौर पदाचा मुकूट चढविला गेला. महापौर पदाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर मिरा-भाईदर शहरावर स्वत:ची अशी आगळीवेगळी छाप पाडली होती. महापौरपदी विराजमान असतानाच मेहता यांनी आता “एकच लक्ष विधानसभा” असे ध्येय उराशी बाळगले होते. विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना अपक्ष उमेदवार म्हणून आपला निभाव लागणार नाही, याचे भान ठेऊनच मेहता यांनी भाजपाची वाट धरली होती. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी कधी नाही ते बहुमताने भाजपला मीरा भाईंदर महापालिकेच्या सत्तेत आणून आपण पावर फुल असल्याचे दाखवून दिले होते.

नरेंद्र मेहतांच्या भंडारच्या आगमना पूर्वी भाईंदरवर दोन्ही काँग्रेसचे अनेक वर्ष राज्य होते. भाईंदरचा पहिला आमदार होणाऱ्या गिलबर्ट मेंडोसा यांचा प्रभाव करून निवडून आलेल्या मेहतांनी मग मागे बघितले नाही त्यांचा वारू भरधाव दौडत होता.परंतु त्याच दरम्यान पालिकेतील टक्केवारीने त्यांचा घाट करण्यास सुरुवात केली. मीरा भाईंदर महापालिका आणि ठेकेदारी हे एक अर्थकारणाचे मोठे स्तोत्र असल्याने त्याचा फटका नरेंद्र मेहतांना बसू लागला होता. जवळचे नगरसेवक नाराज होऊ लागले होते. त्याचा फायदा घेऊन स्वपक्षातीलच गीता जैन यांनी विधानसभा निवडणुकीत मेहतांना थेट आव्हान देऊन त्यांचा प्रभाव केला. हे कमी होते तर मेहतावर वेगवेगळे आरोप होण्यास सुरुवात झाली . त्यांच्यावर न्यायालयात याचिकाही दखल झाल्याने याचा फटका पक्षाला बसेल म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या सर्व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेतल्याचे जरी जाहीर केले असले तरी त्यांनी नीरा भाईंदर भाजपवरील आपली पकड मात्र सुटू दिली नव्हती.

Mumbai
शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण नको: नायडू

फक्त राजकारण सन्यास हे दाखवण्यासाठी होते. कारण पक्षाच्या बैठका किंवा पालिकेतील नगरसेवकांच्या आढावा बैठका नरेंद्र मेहता महापौरांच्या दालनात बसून घेत असल्याची खुलेआम चर्चा मीरा भाईंदर मध्ये चांगलीच गाजत होती. याच दरम्यान नरेंद्र मेहतांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या जिल्हा अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना हटवून त्यांच्या जागी पक्षाने ऍड रवी व्यास यांची नेमणूक करून नरेंद्र मेहता यांना इशारा दिला होता. पक्षाच्या या निर्णया विरोधात मेहता समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिले होते. आणि राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. परंतु त्या कडे पक्षाने पूर्ण पणे दुर्लक्ष केल्याने मेहता समर्थकांचा भ्रमनिरास झाला होता. म्हणूनच आता आपण सक्रिय राजकारणात परत आलो नाही तर महापालिका आपल्या हातून जाईल याची जाणीव झाल्याने मेहतांनी आपल्या वाढ दिवसाचे औचित्य साधून पुन्हा राजकारणात परतण्याचे ठरविल्याचे याठिकाणी बोलले जात आहे.

नरेंद्र मेहता यांच्या पक्षात परत येण्याने येणारी निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार कि जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांच्या हा कळीचा मुद्दा ठरणार आहे . तूर्तास भाजपला नरेंद्र महेता यांच्या शिवाय दुसरा चेहरा नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com