diwali return mumbai goa highway traffic
ESAKAL
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
विशेषतः माणगाव आणि इंदापूर भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील दीड तासांपासून वाहने अडकून पडली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.