Mumbai : गोदी कामगारांना ठेंगा, बिहार भवनसाठी पायघड्या; फक्त १५५ कोटींमध्ये दिली जागा

Mumbai News : पिढ्यान्पिढ्या बंदरात घाम गाळणाऱ्या या कामगारांना आजही डोक्यावर छप्पर मिळालेले नाही: मात्र बिहार भवन उभारण्यासाठी त्याच पोर्ट ट्रस्टची ०.६८ एकर जमीन अवघ्या १५५ कोटीमध्ये बिहार सरकारच्या घशात घातली गेली.
Mumbai News Bihar Bhavan Gets Port Land At Low Cost

Mumbai News Bihar Bhavan Gets Port Land At Low Cost

Esakal

Updated on

नितीन बिनेकर, मुंबई, ता. २० : गेल्या १२ वर्षांपासून गोदी कामगार हक्काच्या घरासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठपुरावा करीत आहेत; मात्र प्रत्येकवेळी नियमांची भिंत पुढे करून त्यांची मागणी बाजूला सारली जाते. पिढ्यान्पिढ्या बंदरात घाम गाळणाऱ्या या कामगारांना आजही डोक्यावर छप्पर मिळालेले नाही: मात्र बिहार भवन उभारण्यासाठी त्याच पोर्ट ट्रस्टची ०.६८ एकर जमीन अवघ्या १५५ कोटीमध्ये बिहार सरकारच्या घशात घातली गेली. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दुटप्पी भूमिकेवर कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com