

CM Appeals for Patience on Sowing as State Prepares Farm Loan Waiver Plan
sakal
मुंबई : ‘‘राज्यातील काही भागांत उद्या (ता. १) वादळी पावसाची शक्यता असली तरी मॉन्सूनशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे या पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये,’’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तसेच, वादळी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत सुरक्षित राहावे, असेही फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.