नालेसफाईची पोलखोल! 'या' परिस्थितीला पालिका-राज्य सरकार जबाबदार; वर्षा गायकवाड यांचा आरोप

Varsha Gaikawad
Varsha Gaikawad

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना आम्ही यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, घोटाळा आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झालेली आहे.असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

Varsha Gaikawad
Ahmednagar : हरीश्चंद्र गड अभयारण्यातील शेकरूंची संख्या वाढली; गतवर्षीची संख्या होती १८५

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे महानगर पालिका आणि सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे पहिल्याच दिवशी फोल ठरलेले आहेत.शिंदे- फडणवीस सरकार आणि मनपा अधिकारी धांदात खोटे बोलले असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.

पाणी साचले, वाहतूक थांबली

पहिल्याच पावसात मुंबईत अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, सायन, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले होते.

परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली, त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com