
rice farming in palghar
ESakal
वाणगाव : मागील काही दिवसांत पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे भातशेतीवर करपा, कडा करपा, बगळ्या रोग आणि काही प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव जाणवत होता. सध्या पालघर जिल्ह्यात गारवा, पाऊस सरींच्या स्वरूपात बरसत असल्याने भातपिकाला चांगले फुटवे आले आहेत. जिल्ह्यातील हळवी भातपिके फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.