Mumbai Water Supply: मुंबईकरांवर ४४ तासांची पाणीकपात! २० ते २२ जानेवारीला पाणी संकट; कोणत्या भागांवर परिणाम?

Mumbai Water Crisis: मेट्रो ७अ प्रकल्पांतर्गत पाईपलाईन स्थलांतरित झाल्यामुळे २० ते २२ जानेवारी दरम्यान मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहील किंवा कमी दाबाने असेल.
Mumbai Water Supply cut

Mumbai Water Supply cut

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो ७अ' प्रकल्पासाठी २,४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे. वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाईल. त्यामुळे मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स , कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. तसेच अन्य काही भागातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com