

डोंबिवली : उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दोन तीन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. वातावरण काहीसे ढगाळ असतानाच शुक्रवारी दुपारी कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण असून रस्त्यावर चालताना नागरिकांना, वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. शहापूर येथे गरपीटचा पाऊस तसेच मुरबाड येथे ही पाऊस पडला आहे.