मुंबई - राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं. यामध्ये मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आझाद मैदानात बोलताना, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अवैध नागरिकांना हाकलूनच द्यावं लागेल, त्याला काही तडजोड केली जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलंय. उद्या दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी भाषणातून भरलाय.
मोठी बातमी : 'या' नणंद-भावजयीचं होतंय कौतूक...; वाचा का ते...
भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही, माझा देश म्हणजे धर्मशाळा नाही असंही राज ठाकरे म्हणालेत. भारतात जे काही अतिरेकी हल्ले झालेत, मग त्यातील मुंबईत झालेले साखळी ब्लास्ट असतील या सर्वांच्या म्होरक्यांना पाकिस्तानने आश्रय दिलाय. मग तिथे अत्याचार होणाऱ्या हिंदूंना आपण देशात घायचं नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मोठी बातमी : 'ब्रेकअप'नंतर बर्गर फ्री, वाचा काय आहे गुड न्यूज...!
भाषणातील १८ महत्त्वाचे मुद्दे
eighteen pointers of raj thackerays aazad maidan chale jao rally speech
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.