
Deputy CM Eknath Shinde
ठाणे : महाराष्ट्रात बीएसएनएलचे स्वदेशी ४जी नेटवर्क सुरू होत असून, राज्यात १० ते २० हजार नवीन टॉवर्स उभारले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांना उत्तम इंटरनेट सुविधा मिळणार असून, शिक्षण, आरोग्यसेवा (टेलीमेडिसीन) व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.