Eknath Shinde: कल्याण-डोंबिवलीकरांना स्वतंत्र धरण मिळणार, पाणीटंचाईची समस्या सुटणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन

Kalu Dam Project: कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमची सुटण्यासाठी येथे स्वतंत्र धरण उभारले जाणार आहे. येत्या काहीच वर्षांत या धरणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Eknath Shinde says on Kalu Dam Project

Eknath Shinde says on Kalu Dam Project

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेचे स्वतंत्र धरण असावे. याकरिता काळू धरण उभारण्यासाठी मुख्यमंत्री असताना चालना दिली व त्यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून तत्काळ पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमची सुटण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे येत्या काहीच वर्षांत स्वतंत्र धरणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com