Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

PM Modi Funds Maharashtra : उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या "केंद्राने राज्याला काय दिलं?" या प्रश्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिउत्तर दिलं. युपीएच्या ७० वर्षांच्या तुलनेत मोदी सरकारने १० वर्षांत महाराष्ट्राला ५ पट जास्त निधी दिला असं ते म्हणाले.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

Summary

  1. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमित शहा यांनी १० हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ केला.

  2. वाढवण बंदर, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट व मेट्रो-3 प्रकल्पांना केंद्राने निधी दिला.

  3. शिंदेंनी आरोप केला की महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प ठप्प होते, तर आताच ते पूर्णत्वाला जात आहेत.

युपीएच्या ७० वर्षांच्या कार्यकाळात जेवढा निधी महाराष्ट्राला मिळाला नाही त्याच्या ५ पट निधी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात मिळाला आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्वव ठाकरेंना लगावला आहे. काही लोक केंद्राने राज्याला काय दिलं असं सवाल करतात पण त्यांना घ्यायची सवय आहे द्यायची नाही असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला. गोरेगावमधील नेस्को मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com