आरक्षणामुळे प्रवेश मिळण्यात होतोय गोंधळ

Mission-Admission
Mission-Admission

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास आठवडा शिल्लक असतानाही अद्याप प्रवेशासाठी जागा जाहीर झालेल्या नाहीत. यंदापासून प्रवेशासाठी मराठा आणि सवर्ण आरक्षण लागू झाल्याने जागांबाबत गोंधळ आहे. अशातच नामांकित महाविद्यालयांतील जागा वाढल्याने आरक्षित जागांचाही पेच निर्माण झाला आहे. यामुळे प्रवेशासाठी उपलब्ध होणाऱ्या आरक्षित जागांचा तपशीलही उपसंचालक कार्यालयाला जाहीर करता आला नाही.

अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आठवडाभरावर येऊन ठेपली आहे, तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नेमक्‍या किती जागा आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. यंदा अकरावी प्रवेशात मराठा आरक्षण १६ टक्के आणि सवर्ण आरक्षण १० टक्के लागू झाल्याने आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्‍क्‍यांवर पोचली होती, त्यामुळे शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी व्यवस्थापन कोट्यातील १० टक्के जागा कमी केल्या, त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. आरक्षणामुळे प्रवेशाचा पेच निर्माण झाला असतानाच दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने त्यात आणखी भर पडली आहे. आरक्षणानुसार किती जागा मिळणार, हे अद्याप समजू न शकल्याने पसंतीक्रम कसे भरणार, असा पेच विद्यार्थ्यांपुढे आहे.

एकत्रीकरण दोन दिवसांत
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पाच टक्के, कला आणि वाणिज्य शाखेच्या आठ टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने ६,६२२ जागा वाढल्या. त्यामुळे आरक्षणाच्या जागांचा ताळमेळ घालण्याचे काम सुरू आहे. एकूण जागांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल, असे मुंबई विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com