'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात, पण मानसिकता कायम'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात, पण मानसिकता कायम'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद आदी मुद्यांवर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचे नाव असल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी केला होता. दरम्यान, भाजपनेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्णब यांना झालेल्या अटकेची तुलना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणिबाणीशी केली आहे.

देवेद्र फडणवीस  यांनी म्हटले की, 'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.' 

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com