

Uttan Virar Sea Link Project
ESakal
विरार : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासादायक बातमी आली आहे. वाहतूक कोंडीवर 'रामबाण' उपाय ठरणारा उत्तन-वसई-विरार सी लिंक (Uttan-Vasai-Virar Sea Link - UVSL) प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास अखंडित आणि सिग्नल-फ्री (Signal-Free) होणार आहे.