Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

"Excessive Rainfall Hits Agriculture: ‘अभूतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानीची दखल घेतली जात नाही. अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तूंची पडझड होते.
Sharad Pawar

Sharad Pawar

sakal 

Updated on

मुंबई: ‘‘राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत. त्याचबरोबर पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करून शेतकरी तसेच व्यावसायिकांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,’’असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शासनाला सुचविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com