शेतकऱ्यांकडून थेट कांदा विक्री 

शेतकऱ्यांकडून थेट कांदा विक्री 

ऐरोली - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा विकण्यासाठी नवी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे 25 ते 30 रुपयांवर गेलेला कांदा ग्राहकांना 16 ते 20 रुपये प्रति किलो मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. 

या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे कांद्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी आले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत चालले आहेत. महिनाभरात कांद्याचे किरकोळ भाव 12 ते 15 रुपयांवरून 25 ते 30 रुपयांपर्यंत गेले आहेत. अशात नाशिकहून आलेले शेतकरी थेट ग्राहकांना स्वस्त दरात कांदा विकत आहेत. हे शेतकरी 16 ते 20 रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहेत. 

मुंबईत ग्राहकांना थेट विक्री केल्याने किलोमागे खर्च काढून पाच ते सात रुपये जास्त नफा मिळतो. म्हणून मुंबईत कांदा आणतो. 1000 ते 1500 किलो माल दोन ते चार दिवसांत विकला जातो. 

लासलगावहून आलेले शेतकरी जगन खळसे म्हणतात, भाव वाढले असल्याने स्वस्त मालासाठी ग्राहक आमच्याकडे येतात. 
- पोपटराव शिरसाट, शेतकरी, विंचूर, निफाड 

दुकानात 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा कांदा इथे 18 ते 20 रुपये किलोने मिळतो. त्यामुळे थोडी बचत होते. 
- उर्मिला सोनार, ग्राहक 

बाजार समितीत कांद्याचा घाऊक भाव 15 सप्टेंबरला 8 ते 10 रुपये प्रति किलो होता, तो 15 ऑक्‍टोबरला दुप्पट वाढ होऊन 15 ते 19 रुपये झाला. त्यामुळे किरकोळ भावसुद्धा 12 ते 15 वरून 24 ते 30 रुपये झाले आहेत. 
- जयेश देशमुख, दुकानदार, कोपरखैरणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com