वसईतील गावांचा मुद्दा पुन्हा तापणार

निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक
Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal CorporationSakal

वसई - वसई-विरार महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. गेली ११ वर्षे सातत्याने महापालिकेत अडकलेली २९ गावे वगळा व नंतरच निवडणुकीचा घाट घाला, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती; परंतु प्रभाग रचनेत या २९ गावांचादेखील समावेश असल्याने हा मुद्दा पुन्हा तापला आहे. ही गावे पालिकेतून वगळण्यासाठी ग्रामस्थ सरकारकडे दाद मागण्याच्या तयारीत आहे.

वसई-विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याच्या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात लोकशाही मार्गाने नागरिकांनी आंदोलन केले होते. त्या वेळी पालिका प्रभाग रचनेवर हरकतीदेखील घेण्यात आल्या; परंतु मे महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये गावांसह महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुनावणीदरम्यान गावे वगळावीत, अशी हरकत घेण्यात आली होती; परंतु त्यावर अद्याप उत्तर मिळाले नसताना पालिकेत गावे समाविष्ट करून प्रभाग रचना जाहीर कशी केली, असा प्रश्‍न ॲड. जिमी गोन्साल्विस यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com