अंतिम सत्राच्या परीक्षांचा फेरविचार होणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

अंतिम सत्राच्या परीक्षांचा फेरविचार होणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
Updated on


मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठातील 32 लाख पैकी 25  लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत 20 जून रोजी आढावा घेण्यात येईल, यावेळी परीक्षांचा फेरविचार करु पण आता अभ्यास करा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आपल्या राज्याने सर्वात प्रथम हालचाल करून 35 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वात अगोदर घेतला आहे. राज्यातील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या या वर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. मात्र उर्वरित 7-8 लाख विद्यार्थी जे पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत, त्यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा होणार्या 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनीही धीर धरावा, पॅनिक होऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यूजीसीला आम्ही ही सर्व परिस्थिती कळवणार आहोत. मात्र जोपर्यंत यूजीसीकडून कोणतीही स्पष्ट सूचना येत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेत, असे समजूनच घरी राहून शांतपणे अभ्यास करावा, असे सामंत म्हणाले.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील हे यूजीसीचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. यावेळी आढावा होणार आहे. ज्या सत्राच्या परीक्षा होणार आहेत. त्या सर्व परीक्षांबाबत 20 जूनला आढावा घेण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण समजू शकतो. या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना इतके सांगू शकतो की, उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच होतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसारच आम्ही या परीक्षा घेणार आहोत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला या परीक्षांमुळे धोका आहे. ते बाधित होऊ शकतात, तर आम्ही त्यावेळी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ आणि या परीक्षांचा देखील फेरविचार करू. सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली. 

खासगी तसेच स्वायत्त विद्यापीठांनाही सूचना देणार
स्वायत्त विद्यापीठे तसेच खासगी विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता आहे. मात्र येत्या दोन दिवसांत या स्वायत्त विद्यापीठांच्या कुलगुरूंनादेखील राज्य सरकारच्या वतीने पत्र जाईल. त्यांनाही राज्य सरकारच्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच निर्णय घ्यावयाचे आहेत. त्यामुळे याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल.

परीक्षा शुल्कासंदर्भात बैठक होणार
परीक्षा काही दिवसात होणार होत्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या त्या विद्यापीठांना परीक्षा व अन्य फी भरली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत निर्णय घेता येईल. राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बैठक होणार असून त्या बैठकीत परीक्षा शुल्काबाबतचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी-पालकांच्या हिताचाच विचार यावेळी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे असेही सामंत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com