इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू 

इमारत दुर्घटना
इमारत दुर्घटना

मुंबई : केसरबाई इमारत दुर्घटनेत आतापर्यंत सायरा शेख या महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत. या इमारतीत 10 ते 15 कुटुंबे राहत असल्याचे बोलले जात असले तरी खात्रीलायक माहिती मिळत नसल्याने ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याचा अधिकृत आकडा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
 
साबिया शेख, सायरा शेख, अब्दुल सतोर कालू शेख, मुझलिम मनसुर सलमानी आणि जावेद इस्माईल अशी पाच मृतांची नावे आहेत. केसरबाई इमारत असलेल्या वाडीतील गल्ल्या चिंचोळ्या असल्याने घटनास्थळापर्यंत जेसीबी वा इतर यंत्रणा पोहचत नसल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. एक एक वस्तू उचलून ढिगारा उपसला जात आहे. त्यामुळे बचावकार्यास विलंब होत आहे. 

दबल्या गेलेल्यांचा अंदाज लावणे कठीण
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार केसरबाई इमारतीत 10 ते 15 कुटुंबे राहत आहेत. मात्र, निश्‍चित माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलालाही नेमकी किती कुटुंबे इमारतीत राहत होती याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजून किती जण अडकले असतील याचा अंदाज करणे शक्‍य नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com