

Food Department 5359 hearings have been delayed
ESakal
महेश जगताप
मुंबई : राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न विभागाच्या गेल्या पंधरा वर्षापासून तब्बल ५३५९ सुनावण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.अन्न आणि औषध प्रशासन प्रामुख्याने अन्न सुरक्षा, औषधांची गुणवत्ता, सौंदर्य प्रसाधने आणि भेसळयुक्त उत्पादनांशी संबंधित सुनावण्या घेते. यात कायद्याचे उल्लंघन, बनावट औषधे, परवाना रद्द किंवा स्थगिती, असुरक्षित अन्नपदार्थांची निर्मिती आणि लेबलिंगच्या त्रुटींसंदर्भात कायदेशीर कारवाई व सुनावण्यांचा समावेश होतो.