Mumbai News: अन्न विभागाच्या सुनावण्या रखडल्या, स्थगितीमुळे संख्या वाढल्याचा दावा

Food Department: अन्न विभागाच्या मागील पंधरा वर्षापासून ५३५९ सुनावण्या रखडल्या आहेत. अनेक सुनावणीमध्ये निर्णय न देता स्थगिती देऊन कारवाई न करता सोडून देण्यात येत असल्यामुळे अन्न विभागाच्या कारवाया रखडल्याची माहिती आहे.
Food Department 5359 hearings  have been delayed

Food Department 5359 hearings have been delayed

ESakal

Updated on

महेश जगताप

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न विभागाच्या गेल्या पंधरा वर्षापासून तब्बल ५३५९ सुनावण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.अन्न आणि औषध प्रशासन प्रामुख्याने अन्न सुरक्षा, औषधांची गुणवत्ता, सौंदर्य प्रसाधने आणि भेसळयुक्त उत्पादनांशी संबंधित सुनावण्या घेते. यात कायद्याचे उल्लंघन, बनावट औषधे, परवाना रद्द किंवा स्थगिती, असुरक्षित अन्नपदार्थांची निर्मिती आणि लेबलिंगच्या त्रुटींसंदर्भात कायदेशीर कारवाई व सुनावण्यांचा समावेश होतो. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com