

Minister Gulabrao Patil
sakal
मुंबई: राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत ५१ हजार, ५६० योजना समाविष्ट असून त्यापैकी २५ हजार ६१ योजनांची कामे केंद्र सरकारकडून निधी न आल्यामुळे ठप्प असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. निधीची कमतरता असल्यामुळे कामावर विपरीत परिणाम झाला असून कामाची गती मंदावल्याचेही त्यांनी सांगितले.