मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. काल म्हणजेच १४ एप्रिलला या लॉकडाऊन पूर्ण झाला. मात्र कोरोनाग्रासतःची कमी न होणारी संख्या पाहता केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारनं देशात कुठे किती कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत हे बघून केंद्र सरकारकडून कमी रुग्ण असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात सशर्त परवानगी देता येणार आहे.
काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संबंधीच्या काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये २० एप्रिलपासून देशात काय सुरु असेल आणि काय बंद असेल याबद्दल आज केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
२० एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी
मोठी बातमी - धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना...
२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार
केंद्र सरकारकडून या संदर्भातील एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. दरम्यान या सर्व सुविधा सशर्त सुरु करण्यात देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी जास्त कोरोना रुग्ण आहेत के भाग सील करण्यात आलेले आहेत या ठिकाणी या सुविधा सुरु करता येणार नसल्याचं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
guidelines and notification details issued by government of india after 20th april 2020
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.