समुद्रात बस कोसळली तर तपास करणार नाही का? राज्यसरकारला सवाल

Mumbai_High_Court
Mumbai_High_Court

मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासात राज्य सरकार सहाय्य करीत नसल्याने आज उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

तपास यंत्रणाना सहकार्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी ताकीद ही न्यायालयाने दिली. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हल्लेखोरांनी वापरलेली हत्यारे भाईंदरच्या खाडीत फेकून दिल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे सीबीआयला खोल समुद्रात तपास करायचा आहे. मात्र त्यांसाठी पाण्यात जाण्याची परवानगी पर्यावरण विभाग आणि सागरी किनारा नियमन प्राधिकरण देत नाही आणि अन्य सहाय्यही करीत नाही, असे अतिरिक्त सौलिसीटर जनरल अनील सिंग यांनी हायकोर्टात सांगितले. मात्र तपास यंत्रणेला अशा परवानगीची गरजच नाही, असे न्यायालयाने सुनावले.

उद्या जर बस किंवा विमान समुद्रात कोसळले तर काय लगेच बचाव कार्य करणार नाही का, असा सवाल हायकोर्टाने केला. तपास यंत्रणेला हवे ते सहाय्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दाभोलकर यांची हत्या पुण्यात झाली होती तर पानसरे यांचा खून कोल्हापूर मध्ये झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com