मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज असून मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागात सोमवार मंगळवारी वादळी वाऱ्यांसह 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून जिल्ह्यात दोन दिवसांसाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात आज अंबर अलर्ट असून मंगळवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणातील पावसाचा जोर वाढणार असला तरी काल मुंबईत उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. कुलाबा येथे काल संध्याकाळपर्यंत कमाल 31 अंश आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे कमाल 32.2 आणि 25 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत काही प्रमाणात तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
या काळात समुद्रातही वादळी वारे वाहणार आहेत. किनाऱ्यावर तसेच खोल समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहातील. त्यामुळे मासेमारीसाठी सुमद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
अंबर अलर्ट - नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे.
रेड अलर्ट - सर्व यंत्रणांनी आपत्ती निवारणाची प्राथमिक तयारी करुन ठेवावी.
( संपादन - सुमित बागुल )
heavy rain expected in mumbai thane and palghar with stormy winds
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.