पालघर जिल्हातही विक्रमी पाऊस; वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे कवडास धरण ओव्हरफ्लो... 

पालघर जिल्हातही विक्रमी पाऊस; वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे कवडास धरण ओव्हरफ्लो... 

विरार : पालघर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली असून धरणक्षेत्रातही चांगला पाऊस  झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहेत. वसई विरारला पाणी पुरवठा करणारे कवडास धरण ओव्हरफ्लो झाल्याने वसई विरार पाण्याची समस्या सुटली आहे. जिल्ह्यात 265.44 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर शेतकरीही या पावसाने आनंदित झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झले होते परंतु गेल्या दोन  दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे. तसेच शहरी भागात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाण्याचा साठा वाढला आहे. वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी धामणी धरणात 57.49 टक्के, तर कवडास धरणात 100 टक्के पाणीसाठी झाला आहे. 

त्याशिवाय उसगाव धरणात 36.49 टक्के, पेल्हार धरण 84.69 टक्के पाणी साठा झाला आहे पालघर जिल्ह्यात डहाणू आणि पालघर  तालुक्यात  सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 87.55 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. 
======
पालघर जिल्ह्यात आज झालेला पाऊस

  • वसई:- 196 मिमी
  • जव्हार:- 162.0 मिमी
  • विक्रमगड:-187.0 मिमी
  • मोखाडा:- 87.55 मिमी
  • वाडा :- 222.0 मिमी
  • डहाणू :- 465.28 मिमी
  • पालघर:-379.93 मिमी
  • तलासरी :- 423.8 मिमी

-----
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com