चला भातपिकाला लोळण्यापासून वाचवूया!

अलिबाग :  पारंपरिक ज्ञानाच्या आधारे सोपे सेंद्रिय उपाय या शेतीमध्‍ये करण्‍यात आले आहेत.
अलिबाग : पारंपरिक ज्ञानाच्या आधारे सोपे सेंद्रिय उपाय या शेतीमध्‍ये करण्‍यात आले आहेत.

अलिबाग (बातमीदार) : पावसामुळे भातपीक जमिनीवर लोळले आहे. त्यामुळे तयार भातपीक चिखलात पडून नुकसान होत आहे. भातपीक जमिनीवर लोळू नये, या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकल्याण खात्यातील उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यावर प्रयोग केला आहे. विविध शेतकऱ्यांकडील पारंपरिक ज्ञानाच्या आधारे सोपे सेंद्रिय उपाय करण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला आहे.

नारळ, ऊस याप्रमाणेच भातपिकांची मुळे तंतूमय असतात; परंतु भातपिकाची मुळे व खोड तुलनेने नाजूक असतात. उंच वाढणाऱ्या भातपिकामध्ये जमिनीवर लोळण्याची समस्या जास्त असते. भातपीक कणखर झाल्यास जमिनीवर लोळण्याची समस्या कमी होऊ शकते. टाकाऊ पदार्थातून टिकाऊ खत तयार करून या समस्येवर मात करता येते. मात्र, याचा दरवर्षी वापर करावा. भातपिकामध्ये कणखरता निर्माण करण्याचे काम ‘सिलिकॉन’ हा घटक करतो. त्यामुळे कीडरोगांनाही प्रतिबंध होतो. सिलिकॉन हा घटक निसर्गतः भाताचा तूस, पेंढा, उसाचे चिपाड व पाचट, नारळाची पाने यांच्यामध्ये उपलब्ध आहे. हे पदार्थ टाकून न देता त्यांचा नियमित पुनर्वापर शेतकऱ्यांनी करावा, असे जाधव यांनी सांगितले.

तूस आणून तुसाची काळी राख रोपवाफ्यात वापरावी. या राखेत ९५ टक्के सिलिका असते. भाताचा पेंढा बारीक करून पहिल्या नांगरणीच्या वेळी शेतात मिसळावा.
उसाच्या चिपाडाची राख सेंद्रिय खताबरोबर शेतात मिसळावी. 

उसाच्या रसवंतीगृहातून चिपाड सहज उपलब्ध होऊ शकते. नारळाच्या पानांच्या आणि इतर अवशेषाची राख सेंद्रिय खताबरोबर शेतात मिसळावी. केरळ राज्यामध्येही नारळाच्या पानांची राख शेतात मिसळण्याची पद्धत आहे. तूस, भाताचा पेंढा, उसाचे चिपाड व पाचट, नारळाची पाने, शेण इत्यादींचे कंपोष्ट खत किंवा गांडूळ खत केल्यानेही जैविक सुपिकता व सिलीकॉनचा पुरवठा वाढतो.

दृष्टिक्षेप 
पात कापणे : उंच प्रकारातील पीक जमिनीवर पडू नये, म्हणून पीक तयार होत असताना लावणीनंतर एक ते सव्वा महिन्याने पात कापण्याची स्थानिक पद्धत आहे. मात्र, भाताची लोंबी पोटरीत येण्यापूर्वी ही पाने कापणे आवश्‍यक आहे.
योग्य अंतर : दोन रोपांमधील अंतर कमी असल्यास रोपे पडतात. अंतर जास्त ठेवल्यास सर्व रोपांना योग्य सूर्यप्रकाश मिळाल्याने रोप कणखर होते.
सेंद्रिय खते : रासायनिक नत्र खताच्या अधिक वापरामुळे उंची वाढते आणि पीक जमिनीवर लोळते. (सध्या निम कोटेड युरीया मिळतो. तो हळूहळू विरघळत असल्याने पूर्वीपेक्षा निम्माच देणे योग्य राहील.) उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी शेण खत, जीवामृत, सेंद्रीय खते, जिवाणू खते, अझोला, मासळीचे खत आदी सेंद्रीय खते देणे सोईस्कर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com