

IT cadre Maharashtra government
ESakal
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पाच महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या तांत्रिक आणि प्रशासकीय रचनेला नवी दिशा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयटी-एआय विभागाच्या स्थापनेपासून ते महावितरणाच्या पुनर्रचनेपर्यंतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जे 'विकसित भारत २०४७' चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेली महत्त्वाची पावले मानली जात आहेत.