JNPA 2000 Containers Stuck
ESakal
मुंबई
Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम
JNPA 2000 Containers Stuck : आखाती देशांतील वाढत्या युद्धामुळे जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर परिणाम होत आहे.
उरण : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर झाला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सुमारे १,५०० ते दोन हजार कंटेनर अडकून पडले असून, कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत मालाच्या निर्यातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर होताना दिसत आहे.

