शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

मुंबई : सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळवायचा आहे.  कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. मात्र, शरिरासोबतच मनाचीही मशागत आवश्यक आहे. यातून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. 'कोरोनाशी दोन हात' या कार्यक्रमात ते बोलत होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी कराव्यात. हंगामी सांसर्गिक आजार जसे डेंग्यू व मलेरिया यांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली हवी. यासाठी योग, प्राणायाम यांचेही खूप महत्त्व आहे. कोरोना काळात वाफ घेणे, गरम पाणी पिणे, काढा घेणे यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.

आता आपल्याला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. जिभेवर आणि मनावर ताबा ठेवूनच सदृढ आयुष्य जगता येईल. तसेच, या काळात जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
याकाळात लोकांना समुपदेश करणे हा महत्वाचा विषय आहे. लाॅकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली. व्यवसाय ठप्प पडले. मात्र, याने खचून न जाता वाटचाल करत राहावी. यासाठी मनाची मशागत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com