...म्हणून झाली गांधींजींची हत्या- आव्हाड (व्हिडिओ)

...म्हणून झाली गांधींजींची हत्या- आव्हाड (व्हिडिओ)

मुंबई- राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचा आज (ता.30) स्मृतीदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत गांधी हत्येचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी गांधी हत्या झाल्याचे कारण स्पष्ट केले आहे.

सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले. विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवले. जाती धर्मात विखुरलेल्या भारताला त्यांनी एक केले. धर्मनिरपेक्ष बनवण्याचे काम केले. परंतु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको होते, म्हणूनच महात्मा गांधीविषयी समाजात द्वेष पसरवण्याचे काम संघाने केले आणि अखेरीस महात्मा गांधींजींचा बळी गेला.

आव्हाड पुढे म्हणतात की, काँग्रेस वर्ग एका वर्गात होता तो सर्वसामान्यांचा करण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले. महात्मा गांधी 1924 साली पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर 1934 झाली पुण्यात पहिल्यांदा महात्मा गांधी स्पृश्य-अस्पृश्यतेच्या लढ्यासाठी पुण्यात आले त्यांच्यावर हल्ला झाला. महात्मा गांधी यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. यानंतर त्यांच्यावर एकूण पाच हल्ले झाले. स्वतः नथुराम गोडसेने पंचगणीमध्ये त्यांच्यावर सुऱ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाला.

1934 ला गांधींजींवर पहिला हल्ला झाला. तेव्हा 55 कोटी पाकिस्तानला देण्याचा काही मुद्दाच नव्हता. पाकिस्तानची फाळणी ही स्वातंत्र्याच्या दरम्यान म्हणजे 1946 साली झाली. मग 1942 मध्ये हल्ला का करण्यात आला, असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com