‘आरोपी खेकडे’ राष्ट्रवादीने पकडले!

‘आरोपी खेकडे’ राष्ट्रवादीने पकडले!

ठाणे - रत्नागिरीतील तिवरे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटल्याचा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. यावरून सावंत यांना समाजमाध्यमांवर ‘ट्रोल’ केले जात आहे. आपली चूक लपवण्यासाठी थेट खेकड्यांना लक्ष्य करणाऱ्या राज्यमंत्र्यांचा शुक्रवारी ठाण्यात राष्ट्रवादीकडूनही निषेध करण्यात आला.

आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलिस ठाणे गाठत सहायक पोलिस आयुक्त एन. ए. पडवी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना खेकडे देऊन, जलसंधारण मंत्र्यांनी सांगितलेले हेच ते खेकडे आहेत. यांनीच धरण फोडले आहे. या खेकड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करा; या खेकड्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी केली.

तिवरे धरण फुटल्याने सुमारे २३ निष्पाप गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. दुर्घटना घडल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी धरणफुटीला थेट खेकड्यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारवर कडवट टीका करताना असे दावे करणारे सरकार बेशरम असल्याचेच सिद्ध होत आहे; त्यांना दुसरा शब्दच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या आंदोलनात शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिला अध्यक्षा सुजाता घाग, हेमंत वाणी आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com