बापट आणि पाटील यांचा शिवाजी पार्कवर सत्कार करा- आव्हाड

बापट आणि पाटील यांचा शिवाजी पार्कवर सत्कार करा- आव्हाड

मुंबई- मंत्री गिरीश बापट आणि मंत्री चंद्रकांत पाटील या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तानचे यान पाडले असा दावा केल्यामुळे या दोघांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्कवर सत्कार करायला हवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची सिद्धी भारताने बुधवारी साध्य केली. अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मोहीम फत्ते झाल्याची घोषणा केली होती यानंतर, मंत्री गिरीश बापट यांनी ट्विट करत म्हटले होते की, 300 कि.मी. दूरवरील अंतराळातील भारतावर टेहाळणी करत होता. तो भारताने मिसाईल वापरून नष्ट केला. यानंतर गिरीश बापट यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी आपले ट्विट मागे घेतले.

तसेच, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हे उपग्रह चीन की पाकिस्तानचे आहेत हे लवकरच समजेल असे एका भाषणात म्हटले होते. यानंतर त्यांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. याचाच संदर्भ घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन्ही मंत्र्यावर हल्ला चढवत त्यांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्कवर सत्कार करायला हवा असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com