
Kalyan Latest News: कल्याण-डोंबिवली शहरांसाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांसह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे.
यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे २७ गावांतील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच १०५ दलघमी साठवण क्षमता निर्माण होणार आहे.