Navi Mumbai Municipal Corporation
नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईवर गणेश नाईक यांचा दीर्घकालीन प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ५२ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. नंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. विकासकामे आणि नियोजनामुळे नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation) चर्चेत आहे.