कल्याण - शिस्तीचे पालन न केल्यास 12 तारखेपासून धडक कारवाई

kalyan
kalyan

कल्याण - कल्याण डोंबिवली सहित उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तेवढीच नागरिकांची आहे. ही समस्य सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून आगामी दहा दिवसात बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाले आणि बेशिस्त वाहन चालकांनी नियमांचे पालन केले नाही तर 12 ऑक्टोबर पासून पालिका पोलिस वाहतूक पोलिस आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई करू असा इशारा अप्पर पोलिस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात दिला.

कल्याण डोंबिवली सहित अन्य शहरातील बेशिस्त रिक्षा चालक, वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग बाबत दैनिक सकाळ ने बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, बातम्या आणि नागरिकांच्या तक्रारी पाहता आज सोमवार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कल्याण डोंबिवली सहित उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी पहाता आज कल्याणमध्ये वाधवा हॉलमध्ये रिक्षा संघटना, चालक, प्रवासी संघटना, जागरूक नागरिक आणि आरटीओ वाहतूक पोलिस, पोलिस यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 

या कार्यक्रमात प्रास्ताविक पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले. यावेळी वाहतूक कोंडी कशी होते, बेशिस्त वाहन चालक कसे वागतात याचे कथन करत बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाईचे कथन करत रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी आरटीओची जबाबदारी आणि कामकाज यावर माहिती देत भाडेवाढ बाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून ओला, उबेर आणि रिक्षा चालक याना एकाच नियमाखाली भाडेवाढ आणि सुसूत्रता आणण्याचे काम शासन स्तरावर सुरु असल्याचे सांगत रिक्षाची संख्या वाढल्याने परमिट काही काळासाठी थांबवावे याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे सांगतिले.

यावेळी 20 हून अधिक रिक्षाचालक संघटना, पदाधिकारी, प्रवासी, आणि रिक्षाचालक यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. केवळ रिक्षा चालकांना लक्ष न करता अन्य वाहनांवर देखील कारवाई करावी. शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक पोलिस जागेवर नसणे, आरटीओचा भोंगळ कारभार, पोलिस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. 

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रताप दिघावकर यांनी रिक्षाचालकांनाच आम्ही लक्ष करत नसल्याचे स्पष्ट करत 95 टक्के नागरिक रिक्षाने प्रवास करत असून त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आज रिक्षाचालक आणि नागरिक यांच्यात मोठी दरी निर्माण झाली असून ती दरी कमी करण्याचे काम आमच्यासोबत रिक्षा संघटनेची आहे. एका बेशिस्त रिक्षा चालकामुळे हजारो रिक्षाचालक बदनाम होतात. आगामी काळात प्रवासी वाहतूक घेण्यावरून स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी प्रवाश्याशी सौजन्याने वागले पाहिजे, पुढील दहा दिवासनात रिक्षा संघटनांनी आपल्या रिक्षा चालकाचा बायोडेटा जमा करा, गणवेश कागदपत्रे जवळ ठेवण्यासाठी सक्ती करा, रिक्षामध्ये माहिती लावा, असे आवाहन केले. चौथी सीट घेऊ नका, फेरीवाले, अल्पवयीन रिक्षाचालक, गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालक, यांची आम्हाला माहिती द्या, वाहतूक पोलिस कारवाई करतील त्यासोबत पोलिस देखील त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, बोगस रिक्षाचालकावर कारवाई करण्यात येईल. आता जबाबदारी रिक्षा संघटनांची असून आगामी दहा दिवसात काम करावे आणि 12 ऑक्टोबरपासून कारवाईला सुरुवात करण्यात येईल असे ही यावेळी स्पष्ट केले यावेळी आदर्श रिक्षा चालक , वाहतूक पोलिस आणि पोलिस बाबत संकल्पना स्पष्ट करत जेथे पोलिस कर्मचारी अधिकारी चुकत असेल तर निश्चित कारवाई करू मात्र एकाकडे बोट न करता सर्वांनी एकत्र येऊन ही समस्या सोडाविण्याचे आवाहन केले . 

वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या, जेष्ठ नागरिक, महिला, पालक येऊन मला भेटले यामुळे रिक्षा चालकांचे प्रबोधन होणे गरजेचे होते तेव्हा आज मिटिंग घेतली 10 दिवसाची मुदत अकराव्या दिवशी आढावा आणि 12 तारखेपासून कारवाई होईल. नागरिक टॅक्स भरतात मात्र त्यांना चालायला रस्ता नाही, जे अडथळा करतील, वाहतूक कोंडी करतील, बेशिस्त पणा करतील त्यांच्या वर कारवाई करणार असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त डॉ प्रताप दिघावकर यांनी सकाळ ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com