
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वमधील मंगळराघो नगर, चिकणीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ‘सप्तशृंगी’ नावाच्या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक तळमजल्यापर्यंत कोसळला. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.