कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी 

कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी 

मुंबई :  मुंबई पालिकेने अभिनेत्री कंगना राणौततच्या कार्यालयावर 24 तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई केली. पालिकेने नियमांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळायला हवी. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे केली.  

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाविरोधात कठोर पावले उचलावीत, असे आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला  द्यावेत, असेही निवेदन आठवले यांनी दिले. दरम्यान, कंगना राणौतच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात उतरले असून त्यांनी कंगनाचीही भेट घेतली आहे. 

याशिवाय कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र् भूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com