Missing Case
sakal
विक्रम गायकवाड
नवी मुंबई : १८ वर्षांवरील व्यक्ती बेपत्ता झाल्यास केवळ 'मिसिंग' नोंद न करता, परिस्थितीनुसार थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी पहिलावहिला गुन्हा दाखल केला आहे. एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात ७सप्टेंबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.