थायलंडमध्ये नोकरीच्या बहण्याने फसवून अपहरण करून नंतर म्यानमारला नेण्यात आलेले दोन डोंगरीच्या रहिवाश्यांची 33 दिवसांनी सुटका करण्यात आली.
मुंबई - थायलंडमध्ये नोकरीच्या बहण्याने फसवून अपहरण करून नंतर म्यानमारला नेण्यात आलेले दोन डोंगरीच्या रहिवाश्यांची 33 दिवसांनी सुटका करण्यात आली आहे. पिडीतांच्या कुटुंबीयांनी अपहरणकर्त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिल्यावर त्यांची सुटका दिले. त्यांनी बँकॉक पोलिसांना व्हिसाची मुदत संपल्यानंतर जास्त मुक्काम केल्याबद्दल दंड देखील भरला आहे. शेहजाद मोहम्मद तांबोळी वय 29 आणि सौद नियाजी वय 28 अशी दोघांची नावे असून दोघे मागच्या आठवड्यात देशात परतले. शुक्रवारी रात्री, दोघांनी डोंगरी पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पिडितानी अनेक ट्रॅव्हल एजंट आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
काय घडले
डोंगरी परिसरात राहणारा नवाज पठाण या व्यक्तीने दोघांना थायलंडला नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. दोन्ही पिडीत डोंगरी येथील नवाज पठाण यांच्या कार्यालयात भेटले. तिथे त्यांनी उमर नावाच्या व्यक्तीची आरोपिंशी त्याचा बॉस असल्याचे सांगत ओळख करून दिली तसेच उमर त्यांना नोकरी मिळवून देण्यात मदत करेल असे आश्वासन दिले.कार्यालयात त्यांचा एक छोटेखानी इंटरव्ह्यू झाला आणि त्यात दोन्ही पिडीत नोकरीसाठी पात्र असल्याचे त्यांना सांगण्यात आले. काहीदिवसानंतर एका चिनी नागरिकांचा त्यांना फोन आला ज्यात त्याने बाकी सोपस्कार पूर्ण केले. सर्व गोष्टींची खात्री केल्यानंतर त्या चिनी नागरिकाने पिडीतांना ईमेल द्वारे विमान तिकिटे सुध्दा पाठवली. 24 ऑगस्ट रोजी दोन्ही पिडीत व्यक्ती बँकॉक ला पोहोचले. बँकॉक येथे पोहोचल्यावर त्यांना फसवून म्यानमार येथे नेण्यात आले.
थायलंड ते म्यानमार
म्यानमारला पोहोचताच तेथील चिनी नागरिकांनी त्यांना काही पेपर वर सह्या करायला संगीतल्या. पेपर मधील अटी पाहता त्यांनी नकार दिला परंतु त्यांच्याशी मारहाण करून त्यांना प्रक्रिया पुर्ण करण्यास भाग पाडले. दोन्ही पिडीतांना नोकरी म्हणून बनावट खोटी ओळखपत्र बनवत अमेरिका, कॅनडा आणि युरोप मधील नागरिकांची ऑनलाईन फसवणुक करण्यास सांगण्यात आले. दोघांनी नोकरीसाठी नकार देताच त्यांच्याकडून मुंबई पासून बँकॉक पर्यंतचा सर्व प्रवास आणि राहण्याचा खर्च शिक्षा म्हणून देण्यास सांगण्यात आले. अखेरीस प्रत्येकी 5 लाख देत दोन्ही पीडितांची सुटका झाली. देशात परतल्यावर पिडीतानी दिलेल्या माहितीनुसार 2500 भारतीय म्यानमारमध्ये अडकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे अशा नागरिकांना टारगेट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.