Mumbai : कोकण रेल्वे मार्गावर आता विद्युत इंजिन सुसाट

गुरुवारपासून 'या' रेल्वे गाड्यांचा वाढणार वेग !
Konkan Railway
Konkan Railway sakal media

मुंबई : रेल्वे गाड्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. कोकण रेल्वेने दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस , कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचणार आहेत.

भारतीय रेल्वेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशभरता रेल्वे मार्ग विद्युतीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार, रेल्वे मंत्रालयाने २०१६ रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजूरी दिली होती. रत्नागिरी ते थिवी या दरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटीं रुपये खर्च करण्यात आला आहेत.

आता टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. त्यानुसार, दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस आणि मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिनीनुसार, मुंबई ते रोह्यापर्यत विद्युतीकरण असल्याने विद्युतप्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना चालविण्यात येत होते. रोह्या स्थानकांपुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेल इंजिन जोडून गाड्या मार्गस्त करावे लागत होते; मात्र, आता विद्युतीकरण पूर्ण झाल्याने टप्याटप्याने सर्व गाडयांना विद्युत इंजिनावर धावणार आहे.

ग्राफिक्स

  • विद्युत इंजिन लागणार -

  • १५ सप्टेंबर २०२२

  • दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस

  • २० सप्टेंबर २०२२

  • मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस

  • १५ ऑक्टोबर २०२२

  • जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रे

  • १ जानेवारी २०२३

  • मुंबई मेंगलोर एक्स्प्रेस

  • कोट्यवधी रुपयांची होणार बचत -

मुंबई ते कोकणा मार्गावर अप-डाऊन एकूण २० रेल्वेगाड्या धावतात. देशातून एकूण ३७ रेल्वे गाड्यांची वाहतूक कोकणात होते. विद्युतीकरण बाकी असल्याने डिझेल इंजिनच्या मदतीने रेल्वे गाड्यांची वाहतूक केली जात होती. बारा डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेल लागत होते. त्यामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात वापर होतो. इंधनावरही वर्षाला साधारणत १५० ते २०० कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबर आर्थिक बचत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com