
मुंबई - तुरुंगांतील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. आता पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांनी सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या तुरुंगांमधील सात वर्षांपर्यंत शिक्षा झालेले व छोटे गुन्हे केलेल्या कैद्यांना सहा आठवडे पॅरोलवर सोडावे. त्यासंदर्भात एक समिती स्थापन करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 23 मार्च रोजी दिली होती. त्यानुसार सुमारे 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडले जाणार आहे; परंतु राज्य सरकारने अद्याप येरवडा तुरुंगात कार्यवाही केली नसल्याचा दावा या कैद्यांनी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
मोठी बातमी -
येरवडा तुरुंगातील 867 कैद्यांनी पाठवलेल्या या पत्राबाबत सोमवारी सुनावणी झाली. कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची कार्यवाही सुरू केली असून, त्यासाठी आणखी काही काळ लागेल, असे राज्य सरकारने सांगितले. याबाबत सद्यस्थितीचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे.
letter to bombay high court for releasing prisoners from yerawada prisone on parole
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.