crime news
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसहून बनारसकडे जाणाऱ्या एलटीटी-बनारस एक्स्प्रेसमध्ये सीटच्या कारणावरून झालेल्या वादानंतर प्रवाशाच्या बॅगेतील १०.५३ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तब्बल २५ दिवसांनी १९ मे रोजी एलटीटी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, तीन अज्ञात प्रवाशांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.