Crime
Esakal
नवी मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला. मात्र, या घटनेनंतर राज्यभरातील अनेक पीडित महिला आणि पुरुषांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर, गेल्या ३० दिवसांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुढाकारातून राज्यभरात तब्बल १४ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.