

Delhi Protest Draws Sharp Reaction from Devendra Fadnavis, Labels It Political Drama
sakal
मुंबई: दिल्लीतील नेतृत्वविरहित किंवा चेहरा नसलेल्या आंदोलनात काही राजकीय पक्ष आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. तसेच, परिस्थितीवर पोलिसांनी वेळीच आंदोलकांवर नियंत्रण आणले नसते तर तेथे अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.